शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत विकासकामांसाठी सहकार्य करणार : रेश्मा सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 22:53 IST

सावंतवाडी : गावात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. मात्र, सरपंच व ग्रामसेवकांनी समन्वय साधून कामाबाबत पाठपुरावा केल्यास गावचा विकास शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपले सहकार्य राहणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी येथे मंगळवारी सांगितले.येथील तालुका स्कूलमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामे व योजनांची आढावा ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद आढावा बैठक; सरपंच, ग्रामसेवकांनी समन्वय साधावाविविध विकासकामे व योजनांची आढावा बैठक

सावंतवाडी : गावात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. मात्र, सरपंच व ग्रामसेवकांनी समन्वय साधून कामाबाबत पाठपुरावा केल्यास गावचा विकास शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपले सहकार्य राहणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी येथे मंगळवारी सांगितले.

येथील तालुका स्कूलमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामे व योजनांची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, सभापती रवींद्र मडगावकर, उपकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, उपसभापती निकिता सावंत, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, रोहिणी गावडे, श्वेता कोरगावकर, पंचायत समितीसदस्य पंकज पेडणेकर, संदीप नेमळेकर, रूपेश राऊळ, मेघश्याम काजरेकर, आदी उपस्थित होते.यावेळी विविध विकासकामांबाबत उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. यामध्ये पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये अनेक गावांत असलेली राजकीय दुफळीही दिसून आली, तर ज्या कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या नाहीत, त्या ग्रामपंचायतींनी तत्काळ त्यांची पूर्तता करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा यावेळी शेखर सिंह यांनी दिला.बांदा-नेतर्डे-गाळेल या मार्गावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेला रस्ता एका महिन्यातच वाहून गेला. याबाबत उपसरपंच प्रशांत कांबळी यांनी लक्ष वेधले असता चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. विलवडे येथे नळपाणी योजनेसाठी खोदण्यात आलेल्या विहिरीत भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप पाणीपुरवठा सचिव संतोष दळवी यांनी केला. विहिरीची पूर्ण खोदकाम न करता ठेकेदाराला बिल अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कामाच्याचौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवालही आला नसल्याचे त्यांनी सांगितले.मळगाव येथील पथदीपांबाबत पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ यांनी लक्ष वेधले. या कामाचा प्रस्ताव पाठवीत नसल्याबाबत लक्ष वेधले असता तसा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याबाबत शेखर सिंह यांनी ग्रामसेवकांना सूचना दिल्या. एकंदरीत विविध कामांत राजकीय दुफळी दिसून आली. मात्र, ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वय साधून काम करा, आपले सर्वांना सहकार्यराहील, असे रेश्मा सावंत यांनी स्पष्ट केले.विंधन विहीर खोदण्याच्या सूचनावेर्ले येथे सहा वाड्यांना उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा होतो. त्या ठिकाणी राष्ट्रीय पेयजलमधून पाण्याची सोय करण्यात यावी, नळयोजनेच्या विहिरीलगत असलेल्या नदीवर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.यावर जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी तात्पुरती पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तेथे विंधन विहीर खोदण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :Politicsराजकारणzpजिल्हा परिषद